कविता संग्रह- मन पाखरू

पहिल्या नजरेतमुख्यपृष्ट पाहताअसे वाटते कि कवी विलास कदम हे इतर कविंप्रमाणे फक्त 'जे  देखे रविते देखे कवीया मुक्त रसिकतेच्या छंदात न्हालेल्या काव्यांचा वर्षाव करणार आहेतपण कवितांचे वाचन करताच ही धारणा मिटतेअसे दिसते कि कवी निसर्गमानवीय भावनाआक्रांत  आत्मिक निर्मलता यांची सांगड घालीत आपल्याला त्यांच्या भावविश्वातून सत्य आणि त्यात दडलेले सौंदर्यउत्कटता आणि जगण्याचा हव्यास याची जाणीव करून देतात

निसर्गाशी असलेले बालपणापासूनचे नाते आणि त्यात रमणारे मन 'मन पाखरूया 'शीर्षककवितेत दिसून येते
कधी उंच झुल्यावर,
मन अथांग सागर… 
असे भुइवर आता जाई गगनी सत्वर
उंडरते जेव्हा तेव्हा 
वार भरलेले वासरु
असेच 'जीवनसागर', 'पाणी', 'जगणे',  या कवितांतील जलफुलंवनराईप्राणीमात्र यांचा आपल्या भावनिक आणि भौतिक जीवनावर होणारा प्रभाव व्यक्त करतात

निसर्गाच्या रम्य वातावरणासोबत कवींना रोजच्या जगण्यासाठी केलेल्या मानवी संघर्षाचाही प्रत्यय आलेला आहेहा संघर्ष फक्त त्यांच्या निसर्गरम्य आबलोली गावापुरता मर्यादीत नसून शहरातही याचा अनुभव कवी विलास यांना आला आहेकारण ते समाज कार्यात सक्रीय आहेत आणि त्यांनी आपल्या बांधवांना गरिबीदारिद्र्य आणि दीन जीवनातून मुक्त करण्याचा ध्यास घेतला आहेत्यासाठी ते गोरगरीब समाजात वावरत असतातपण कवींना एक गोष्ट जाणविली आहे किजगण्यासाठी करीत असलेला संघर्षबिकट परीस्थितीबेआसरा असलेल्या आशाया सर्वांवर मात करता येतेआणि ती मात त्यांनी कवितांतून स्पष्ट केली आहेही मात करताना आशेचा सूर्य मनात तळपत राह्तो. 'आशावादसर्व दुखी आणि निराश भावना आणि विचारांना घालविण्याचा जालीम उपाय म्हणून कवितांमधून प्रकट होतो. 'नवरीया कवितेतील निरागस मुलीचा आपल्या गरीब आईला केलेला प्रश्न 'माय कधी  आपण… चांगल्या घरात जाणार?' तिच्यासाठी तिच्या मातेची आशा कि तिच्या मुलीला हे सुख चांगल्या घरात लग्न केल्यावरच प्राप्त होईल आणि त्याबरोबरच सध्यास्थितितील सारी सत्येजशीगरीब परिस्थितीभीक  मागायची लाचारी आणि तोडक्या-मोडक्या घरातही चांगल्या भविष्याची आशा जोपासण्याची हिम्मत सामोरी येतेआशावादी  युवकांना 'पाखरेअसे संबोधून कवी 'घरट्यासाठीया कवितेत नवयुवकांना नवी घरटी मिळाल्यावर झालेला आनंद व्यक्त करतातउमेदीं अजून फुलून येतात  ठाम होतातह्या कवितांनी आपल्यालाही प्रेरणा मिळतेजेव्हा आपण वाचतो:
(6AM Drawing by Tathi Premchand)

'नव्या उमेदीन मारली भरारी
नव्या घरट्याकडे
जेव्हा मिळाले पाचूचे दाणे
रमले सारी आनंदाने नव्या घरट्यात"

किंवा 

जीवनप्रवाहात तुम्ही 
द्या स्वतःला झोकून 
ठेवू नका झाकून आणि 
बघू नका वाकून…. 

सांसारिक सुखप्रेमऋणानुबंध जपताना अनुभवलेले आठवणीतील कित्येक क्षण सुरेख शब्दरूपात मांडून कवी वाचकाला मुग्ध करतातभारावून टाकतातदुखी क्षणांत आनंदाच्या आठवणी करून देतात. 'प्रवाह', 'संसार', 'रुपगर्वितह्या अशाच काही कविता आहेत.

कवीच्या जीवनातील कडू गोड अनुभवव्यक्तिगत सामोरी अनुभवलेले प्रसंग आणि लोकांच्या स्वभावांचे झालेले दर्शन मांडतात.  'मन मनातले', 'अंतरीह्या कविता आत्मबोधक वाटतातकाही कविता सुरेख शब्दरूपात असल्या तरी त्या कुणाला उद्देशून आहेत ते स्पष्ट होत नाही,  तरीही त्या वाचनीय आहेतमला आवडलेली त्यांची 'माताया कवितेचे वाचन करताना कवी सुर्यकांत खांडेकर यांची कविता 'त्या फुलांच्या गंध कोषी सांग तू आहेस का…" आठवतेजी निरंकाराला उद्देशूनत्याच्या सर्वव्यापी असण्याचा पुरावा देतेतसेच या कवितेतून आईच्या विविधी रूपांचे आणि  सहनशीलप्रेमळसामर्थ्यवान स्वभावाचे दर्शन होते.   


कधी कोमल कधी सोज्वळ 
रूप दिसे तुझे मनमोहक 
चाण्डीकाच्या रुपी तुझ्या 
विषारी विकार थरारले… 


एकूणच 'मन पाखरूकवितांचा संग्रह सर्वतोपरीने आसमंतात भरारी घेणाऱ्या पाखरासारखा आहेकधी हे पाखरू एकाग्रतेनेशांतचित्ताने आपले पंख  फडकवीत आसमंतात विहार करते आणि कधी आपली उद्वेगना स्पष्ट करण्यासाठी पंखांचे आवाज करून चित्कारत झेप घेते

कवी विलास कदम यांच्या कविता पहिल्यांदा प्रकाशित झाल्या आहेतही त्यांची पहिली झेप आहे आणि त्यात ते सफल झाले आहेतह्या साहित्यप्रकारात त्यांची वाटचाल अशीच होत राहो आणि त्यांनी स्वतःच्या विचारांना अजून कसून आपले विचार काव्य रुपात प्रस्तुत करावे या साठी माझ्या त्यांना अनेक शुभेच्छा.     


मुंबई 
दिनांक२४ मार्च २०१३ 

"मन पाखरू-विलास गणपत कदम.

     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत “लॅण्डस्केप्स ऑफ द सोल” जेसल दलाल आणि हेमाली शाह यांच्या चित्रमय आत्मशोधाचा प्रवास

२२   एप्रिल   ते   २८   एप्रिल दरम्यान   तुम्ही   मुंबईत   असाल ,  तर   आपला   वेळ   नक्की   राखून   ठेवा .  हि    वेळ    तुम्हाला   फक्त   ...