साहस आर्ट फाउंडेशन (SAF)तर्फे "The Art of Now", या सामूहिक चित्रप्रदर्शनाचे आयोजन दि १३ ते १९ मे २०२५ दरम्यान, मुंबईतील प्रतिष्ठित नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, वरळी, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात चित्रकार रितू गोयल, रोझी गुणिती, ज्योती चोरडिया आणि इती जैन यांच्या कलाकृतींचा समावेश आहे.
प्रस्तुत प्रदर्शनातील चित्रकारांच्या कलाकृती या रसिकांना आधुनिक भारतीय कलेकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टीकोन देतात. या प्रदर्शनातील कलाकृतींमध्ये विषयांचे वैविध्य पुरेपूर आहे. यामध्ये पुराणकथा, निसर्ग, भावनिक चिंतन आणि आध्यात्मिक अभिव्यक्ती यांसारख्या विविध विषयांचा समावेश आहे.
रितू गोयल या एक अनुभवी समकालीन व अमूर्त चित्रकार आहेत. आपले ध्यानधारणा व आध्यात्मिक अनुभव रंगांच्या माध्यमातून त्या कॅनव्हासवर उतरवतात. त्या भारतीय पुराणकथांचा आधुनिक दृष्टिकोनातून पुनरावलोकन करतात, जिथे तेजस्वी अमूर्तता आणि तत्त्वज्ञानात्मक शांतता यांचा सुरेख संगम दिसतो. त्यांच्या चित्रांमध्ये शांतता, सकारात्मकता आणि सांस्कृतिक चिंतन प्रतिबिंबित होते.
_________________________________________________________________________________________
ज्योती चोरडिया या व्यावसायिक चित्रकार आणि SAF च्या सहसंस्थापक आहेत. त्यांच्या चित्रांमध्ये भावनिक अभिव्यक्ती आणि प्रतीकात्मकतेचं मिश्रण आहे. भारत आणि परदेशातील त्यांच्या अनुभवांनी त्यांच्या शैलीत विविधता आणली आहे. तेजस्वी रंग आणि लवचिक रेषांच्या माध्यमातून त्या स्वतः, समाज आणि भावना यांच्यातील संबंध उलगडतात. त्यांच्या चित्रांमध्ये एकाच वेळी वैयक्तिक आणि आध्यात्मिक शोध अधोरेखित केला जातो.
________________________________________________________________________
इती जैन या आयटी व्यावसायिक असूनही त्यांना चित्रकलेचा ध्यास आहे. इती जैन यांच्या कलाकृतींमध्ये इंप्रेशनिस्ट शैलीचा प्रभाव आहे. त्या निसर्गाच्या क्षणिक सौंदर्याला चित्रित करतात. क्लॉद मोने यांच्यापासून प्रेरणा घेत, त्या वॉटरकलर आणि अॅक्रिलिकमध्ये पॉइंटिलिझम आणि मोज़ेक सारख्या तंत्राचा वापर करतात. त्यांच्या कलेचा हेतू म्हणजे प्रेक्षकांना निसर्गाच्या सूक्ष्म गोष्टींकडे सजगपणे पाहायला शिकवणं.
The Art of Now हे केवळ प्रदर्शन नाही तर हे कलेच्या विविध दृष्टिकोनांचा, अंतर्मनातील आवाजाचा आणि मूल्यांचा संगम आहे. रितू गोयल, रोझी गुणिती, ज्योती चोरडिया आणि इती जैन यांच्या विविधतेने नटलेल्या चित्रांमधून प्रेक्षकांना थांबण्याचं, चिंतन करण्याचं आणि पुन्हा स्वतःशी, निसर्गाशी आणि कलेशी जोडण्याचं आवाहन केलं जातं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा